Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिपदावरून एनडीएत खदखद, शिंदे गटाचे बारणे म्हणतात-'शिवसेनेबरोबर दुजाभाव'एक राज्यमंत्रीपद मिळायला पाहिजे

Webdunia
सोमवार, 10 जून 2024 (20:42 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर एनडीएच्या घटकपक्षातील नाराजी समोर यायला सुरुवात झाली आहे. विशेषतः शिंदे गटातील श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

मंत्रिपद वाटपात शिवसेनेला फक्त राज्यमंत्रिपद देऊन दुजाभाव करण्यात आला, असं म्हणत बारणे यांनी नाराजी थेटपणे बोलून दाखवली."शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं", असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.
 
एनडीए मधील एक-एक खासदार निवडून आलेल्या इतर घटक पक्षांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं.मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा सवालही बारणे यांनी उपस्थित केला.
कुटुंबाचा विरोध पत्करून महायुतीत आलेल्या अजित पवारांनादेखिल एक मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणेंनी म्हटलं आहे. तसंच भाजपनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणे म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 71 मंत्र्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्राच्या सहा मंत्र्यांचा समावेश असून शिंदे गटाला फक्त एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. 

बारणे म्हणाले, मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली याचा आनंद आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षातील 16 खासदार निवडून आले तर नितीश कुमार पक्षातील 12 खासदार निवडून आले असून शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले तर चिराग पासवान यांचे 5 खासदार निवडून आले त्यांना मंत्रिपद देण्यात आले मात्र शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद देण्यात आले. शिंदेसेनेकडून खासदार प्रताप राव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या वरून श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments