Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे 'खलनायक' देवेंद्र फडणवीस - संजय राऊत

Webdunia
गुरूवार, 6 जून 2024 (12:05 IST)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.
 
फडणवीसांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राजकारणात अशी नाटकं होत राहतात. मोदी देखील अशा पद्धतीची नाटकं करत असतात. मोदी कधी रडतात, कधी हसतात, कधी पळतात, तर कधी खाली बसतात. हे सगळे नेते त्यांचेच 'चेले' आहेत. महाराष्ट्राने फडणवीसांचं नेतृत्व नाकारलं आहे."
 
संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचे खलनायक जर कुणी असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांमुळेच महाराष्ट्रात भाजपला वाईट दिवस आले आहेत.
 
महाराष्ट्र हा त्याच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जात होता पण देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने बदल्याचं राजकारण केलं, कुटील डाव रचले. महाराष्ट्राच्या राजकारणात विष कालवण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि त्याचीच फळं त्यांना मिळत आहेत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

एअर मार्शल अमर प्रीत सिंग पुढील हवाई दल प्रमुख असतील

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

पुढील लेख
Show comments