Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (20:59 IST)
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आला. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कामकाज चालवणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे.
 
असं आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
1 मार्च : राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. 2020-21 च्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्या जातील. तर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील.
 
2 मा्र्च : या दिवशी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचं शासकीय नियमाप्रमाणं कामकाज होईल. तर राज्यपालांच्या अभिभाषणावर पहिल्याद दिवसाची चर्चा सुरु होईल.
 
3 मार्च : या दिवशी दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. या दिवशी अभिभाषणावरील चर्चा संपेल.
 
4 मार्च: दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे.
 
5 मार्च : दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे. तर पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल.
 
6 आणि 7 मार्चला विधिमंडळाला सुट्टी. 
 
8 मार्चला अर्थसंकल्प
8 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु होईल. सन 2021-22 चा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर केला जाईल.
 
9 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु राहील.
 
10 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु होईल. अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा केली जाईल. यादिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

LIVE: रत्नागिरीत कार नदीत कोसळल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

पुढील लेख
Show comments