Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज; एक कार्यक्रमाला जातील, दुसरे..."-सुप्रिया सुळे

Webdunia
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (09:11 IST)
"सत्ता टिकली पाहिजे, हे त्यांचे धोरण आहे. सत्ता टिकावी यासाठी तडजोड करणे सुरू आहे. लोकांचं नुकसान झालं तरी चालेल पण स्वत:चं नुकसान होऊ नये असं हे स्वार्थी ईडी सरकार आहे. राष्ट्रवादी पक्ष हा संविधान मानणारा आहे. तर भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की, एक देश एक पक्ष आहे. ही एक हुकूमशाहीच म्हणावी लागेल. ही देशातील दडपशाही आहे" असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे
 
 "राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज; एक कार्यक्रमाला जातील, दुसरे..."
"आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काहीनाकाही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी Whatsapp वर पाठवला आहे" असं म्हटलं होतं. तसेच सुप्रिया सुळे यांनी "महाराष्ट्रातलं सरकार ओरबाडून, दडपशाही करून, ईडी करून चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलं आहे. आजकाल ५० खोके, एकदम ओके हे ऐकायला मिळत... हे खूप दुर्दैवी आहे. अडीच महिने झाले आपल्या जिल्हात आणि कुठेही राज्यात पालकमंत्रीच नाही. मी गेले 15 दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय पण मला अजूनही वेळ मिळालेली नाही" असंही म्हटलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments