Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून

Webdunia
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (08:15 IST)
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर तिसऱ्या दिवशी सुनावणी पूर्ण झाली. यावेळी ५ सदस्यीय खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. यावर आता निकाल कधी देणार? हे खडंपीठाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. गेल्या ३ दिवसांपासून सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद पार पडला. या प्रकरणात विविध मुद्द्यांवर निकाल येणे अपेक्षित आहे. पण सध्या हे प्रकरण ७ सदस्यीय खंडपीठाकडे जाणार की नाही? यावरच युक्तीवाद पूर्ण झाला.
 
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली. पुन्हा ५ न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकते का? यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. आज शिंदे गटाने युक्तीवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments