Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

Webdunia
शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (09:02 IST)
पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहील, त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान वर्तवली आहे.
 
राज्यात पावसाच्या हलक्या सारी:
राज्यातील बहुतांश भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. कोकणात आणि खासकरून रत्नागिरीमध्ये ०.५ मिमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये ७.८ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक आणि पुण्यात १.६ मिमी पाऊस झाला. या शिवाय मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये ०.५ मिमी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, अकोल्यात ०.२ तर नागपुरात ०.३ मिमी पावसाची नोंद झाली.
 
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढणार:
दरम्यान दि.११ पासून पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ वातावरण कमी होणार असून, कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

अमेरिकेत तीव्र वादळाचा तडाखा, इमारती कोसळल्या; केंटकीमध्ये 14 आणि मिसूरीमध्ये सात जणांचा मृत्यू

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

पुढील लेख
Show comments