Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील लोड शेडिंगबाबत ऊर्जामंत्री राऊत यांनी केली ही मोठी घोषणा

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (07:58 IST)
वाढत्या उन्हाच्या कडाक्यात वीजेची मागणी असतानाच राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, वीजेची उपलब्धता, निर्मिती आणि कोळशाची टंचाई यामुळे राज्यात लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या ज्या भागात वीज बील थकबाकी अधिक आहे. तेथे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यापुढील काळात कोळसा उपलब्धता आणि वीज निर्मितीचे संतुलन योग्य राहिले नाही तर लोडशेडिंग वाढत जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
राऊत म्हणाले की, केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातच वीजेची टंचाई आहे. देशातील एकूण ९ राज्यांमध्ये लोडशेडिंग करण्यात येत आहे. या परिस्थितीला केंद्रातील कोळसा मंत्रालय जबाबदार आहे. कोळशाचा योग्य पुरवठा नाही. तसेच, अदानी पॉवरने काही प्रमाणात वीज कमी केली. सद्यस्थितीत १५०० मेगा वॉट वीजेचा तुटवडा आहे. ती उपलब्ध झाली तर राज्यातील लोडशेडिंग बंद होईल. ज्या भागात वीज बीलांची वसुली कमी आहे तेथे लोडशेडिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments