Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमधील हेल्मेट सक्तीच्या प्रश्नावर गृह राज्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर

Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (15:00 IST)
नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्ती ही नियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारणी होत असल्याबाबत विधानसभा सदस्य शांताराम मोरे व प्रकाश आबीटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.याला उत्तर देताना गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, व्दारका चौकात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीसांनी अवैध प्रवासी वाहतूकदारांकडून ६३ हजार ४०० रूपये दंड वसूल केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश सर्वच राज्यांना दिलेले होते.

त्यानुसार वाहतूक पोलीसांनी नियमानुसारच कारवाई केली तसेच नाशिक मध्ये १८ जानेवारी ते ११ मार्च दरम्यान विनाहेल्मेट प्रवास करणा-या ८,४७२ लोकांकडून ४२ लाख ३६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे हा दंड नियमानुसारच केला आहे. अशी माहिती माहिती राज्यमंत्री श्री. देसाई यांनी विधानसभेत दिली.यावेळी तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ यांनीही हेल्मेटसक्ती आणि नियमबाह्य दंडआकारणी याबद्दल गृह विभागाने आलेल्या तक्रारींदेखील तपासून पहाव्या अशा सूचना केल्या.
 
 जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा अंतर्गत उद्भव विहीर व पाईप लाईन कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी १४ लाख ६७ हजार ७६० या कामाकरिता मंजूर करण्यात आले होते. या विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.

या कामामध्ये समावेश असलेला उद्भव विहीर व पाईप लाईनमध्ये बदल केला असला तरी त्याला शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. या गावात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही या कामाबाबत काही तक्रारी असल्यास त्याची चौकशी करू अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी विधानसभेत दिली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments