Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 9 मार्च 2024 (16:13 IST)
वर्धा नदीपात्रात अंघोळीला गेलेले पाच तरुण बुडाले या पैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचविण्यात यश आले. अनिरुद्ध चाफले, हरी चाफले, आणि संकेत पुंडरिक नगराळे असे मयत झाल्याची नावे आहेत. सदर घटना महाशिवरात्रीच्या संध्याकाळी भद्रावती तालुक्यात माजरीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर पाटाळा येथील वर्धा नदीच्या पात्रात घडली. 

हे पाच तरुण महाशिवरात्रीच्या यात्रेवरून परत येताना वर्धा नदीत अंघोळीसाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाचही बुडू लागले. तर दोघांनी परतणं करून स्वतःचा जीव वाचवला मात्र इतर तिघे पाण्यात बुडाले. ते तिघे विठ्ठलवाडी येथील रहिवासी होते.तिघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह सापडले नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच त्यांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Russia Ukraine War: मॉस्कोमध्ये मोठा हल्ला, बॉम्बस्फोटात पुतिनचे जनरल ठार

दहशतवाद्यांशी लढणाऱ्या आदिलच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी नीरज सहभागी होणार नाही

CSK vs SRH : हैदराबादने सीएसकेचा घरच्या मैदानावर पराभव केला

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

पुढील लेख
Show comments