Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खाणीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (07:51 IST)
नाशिक शहरालगत असलेल्या आणि ओझर पासून जवळचा असलेल्या सय्यदपिंप्री येथे पाण्यात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सय्यदपिंप्री येथील ग्रामपंचायतीच्या जागेवर असलेल्या खाणीत घडली असून यामध्ये  नंदू वराडे त्यांची पत्नी सविता वराडे व पुतण्या केशव वराडे असे तिघे जण बुडून दुर्दैवी  मरण पावले आहेत.
 
या खाणीत पंधरा फुटांच्या आसपास पाणी असून, येथे कपडे धुण्यासाठी पतीसह गेलेल्या सविता वराडे या पाण्यात पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी पती नंदू वराडे हे मदतीला धावले होते मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, तर या  दोघांना बुडताना पाहून  त्यांना वाचवण्यासाठी पुतण्या केशव वराडे यानेही पाण्यात उडी घेतली होती आमत्र यावेळी तिघे दुर्दैवाने खोल पाण्यात बुडाले होते. या सर्वाना जवळपास अडीच तास शोध घेतल्यानंतर गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. याची  उत्तरीय तपासणीसाठी नासिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास नाशिक तालुका पोलीस करत आहे. या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments