Marathi Biodata Maker

तिवरे धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करा

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2019 (16:23 IST)
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची मागणी
 
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्याच्या निषेधार्थ जबाबदार सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी रविकांत वर्पे आणि सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात निषेध नोंदवला. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधीत खात्याचे मंत्री यांच्यावर करवाई व्हावी असे निवेदन दिले.तिवरे धरणाला काही वर्षापासून तडे गेले होते. स्थानिकांनी त्या संबध विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून आज निष्पाप २३ जणांचा बळी गेला. शासनाला या गोष्टीचे गांभीर्य तर नाहीच, उलट या खात्याचे केबिनेट मंत्री तान्हाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहे. खेकड्यांमुळे धरण फुटले सांगून अंगकाढू पणा हे सरकार करत आहे. खेकड्यांनी हे धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करत असतील तर त्या खेकड्यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

मुंबई महापालिका आयुक्तांची कडक कारवाई, 7 बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकाम स्थळांना सील केले

LIVE: मुंबईला लवकरच नवीन महापौर मिळणार

अजित पवार विमान अपघातानंतर फडणवीस सरकार सक्रिय, सरकारी 'फ्लाइंग बेड्स'च्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपये मंजूर

कार्लोस अल्काराझ पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचला, कठीण सामन्यात झ्वेरेव्हचा पराभव केला

T20 विश्वचषकासाठी सामनाधिकाऱ्यांची घोषणा, दोन बांगलादेशी पंचांचा समावेश; चार भारतीयांना संधी

पुढील लेख
Show comments