Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२० दिवसांनंतर राज्यातील पहिला टोलनाका टोलमुक्त होणार

Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2017 (11:21 IST)
राज्यातील पहिला टो नाका भिवंडी बायपासवरील खारेगाव नाक्यावर आहे. या टोलचे कंत्राट संपले असून २० दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होणार आहे. १५ वर्षांच्या कार्यकाळात या टोलनाक्याने सुमारे ४९० ते ५१० कोटी रूपयांची वसुली केली आहे.  हा रस्ता उभारणी आणि १५ वर्षांतील देखभाल दुरूस्तीचा खर्च १८० कोटी ८३ लाख रूपये होता.
 
सर्वाधिक टोलनाक्यांचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख असून या जिल्ह्यात जवळपास १८ टोलनाके आहेत. त्यातला पहिला टोल नाका हा मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या भिवंडी बायपास रोडवरील खारेगाव येथे उभारण्यात आला होता. केवळ ठाणे जिल्ह्यातलाच नव्हे तर राज्यातला हा पहिला टोल नाका होता. आयआरबी या कंपनीने या रस्त्याची बांधणी केली होती. त्या मोबदल्यात त्यांना रस्त्यावर टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. वास्तविक १९९८ सालापासूनच या रस्त्यावर टोलवसुलीला सुरूवात झाली होती. मात्र, अधिकृत अधिसूचना २००२ साली काढण्यात आली होती.
 
या रस्त्याची बांधणी आणि देखभाल दुरूस्तीच्या खर्चाची आर्थिक सांगड घालून १५ वर्षांसाठी आयआरबी कंपनीला या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांकडून टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. रस्ता बांधकामाचा खर्च आणि १५ वर्षातील देखभाल दुरूस्तीवर कंपनीने सुमारे १८० कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र, व्याज आणि अन्य विविध कारणांपोटी वाढीव टोलवसुलीची परवानगी टोलच्या करारामध्ये देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे ४९० ते ५१० कोटींपर्यंत वसुली गेल्याचे कंपनीच्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments