Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्या ते कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील

Webdunia
गुरूवार, 5 जानेवारी 2023 (15:21 IST)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडून जोरदार तयारीला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटातील १२ नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. खोके, पेट्या, पाकिटे हीच शिंदे गटाची रणनीति असल्याची  टीका संजय राऊत यानी केली आहे.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, रणनीति म्हणजे नेमके काय करतायत? हे तुम्हाला माहिती आहे का? खोके, पेट्या, पाकिटे कशी आणि कुठे वाटायची आणि कुणाला कसे विकत घ्यायचे, हीच त्यांची रणनीति असते. रणनीति आता मतदार ठरवतील. या लोकांचे काय करायचे हे मतदार ठरवतील. खोकेवाले कधी येतायत, याची आता मतदार वाट पाहत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला आहे. त्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे यांच्यासहीत भाजपला घेरले आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी बावनकुळे यांना सुनावले. त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments