Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सातारा, रत्नागिरी, सांगलीसह अन्य जिल्हे व तालुक्यात भूकंपाचे दोन धक्के

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:45 IST)
सातारा, रत्नागिरी, सांगलीसह अन्य जिल्हे व तालुक्यात आज  दुपारी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० व २.८ इतकी होती. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झालेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. पाटण तालुक्यात यातून प्रथमदर्शनी कोणतीही हानी झाली नाही, अशी माहिती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी दिली. 
 
मंगळवारी  दुपारी ३.२१ वाजता पहिला ३.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात चिखली गावच्या पूर्वेस सात किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली १६ किलोमीटर अंतरावर होती. त्यानंतर काही मिनिटांत दुपारी ३.३३ वाजता दुसरा २.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात चिखली गावच्या पूर्वेस सात किलोमीटर अंतरावरच होता. त्याची खोली १५ किलोमीटर अंतरावर असल्याचे भूकंप मापन केंद्र कोयनानगर येथून देण्यात आली. 
 
या दोन्ही भूकंपांची खोली अधिक असल्याने रिश्टर स्केलवरील त्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले. हे भूकंपांचे धक्के पाटण, कराड, सातारा, चिपळूण तालुक्यांसह वारणा खोर्‍यातही जाणवले. या भूकंपांचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झालेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या शिवाय पाटण तालुक्यात सर्वत्र या भूकंपांचे धक्के जाणवले असले तरी प्राथमिक माहितीनूसार कोठेही हानी झालेली नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments