Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत : नितेश राणे

Webdunia
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:43 IST)
भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर खोचक टीका केली आहे.उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत,असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यात त्यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओत नितेश राणे यांनी म्हटलं आहे 'आमच्या कोकणाचे शक्ती कपूर आणि कोकणातील सचिन वाझे यांचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारं वैदयकीय महाविद्यालय, या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. पण या महाविद्यालला परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली,तसंच चीपी विमानतळासाठी विमानसेवा सुरु करण्याची परवानगीही नारायण राणे यांच्यामुळेच मिळाली असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
 
उदय सामंत कदाचित विसरले असतील महाविद्यालय आणि चिपी विमानतळासाठीच्या परवानग्या, मिळवण्यासाठी केंद्र सरकारमध्ये ताकद लागते, वलय लागतं, राणेसाहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर चिपी विमानतळाला परवानगी कशी मिळाली, 2014 ते 2019 मध्ये शिवसेना पक्षाचे अरविंद सावंत हे कोकणाचे भूमिपूत्र आहेत,ते ही केंद्रात मंत्री होते, तेव्हा का परवानगी मिळाली नाही. तेव्हा तर शिवसेना भाजपमध्ये युतीत होतात, पण नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर परवानग्या कशा मिळतात असा सवाल करत घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा हे प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार करावा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रामदास आठवले म्हणाले भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

बुलढाणा जिल्ह्यातील धमक्यांना कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या... तीन वर्षांच्या प्रेमकथेचा दुःखद अंत!

पालघरमध्ये भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments