Festival Posters

निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली, दिलेली आश्वासने खोटी - उद्धव ठाकरे

Webdunia
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (16:08 IST)
दोन्ही ठाकरे बंधू सरकारव आणि भाजपावर जोरदार टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. राज्यात १८० तालुक्यात दुष्काळसद्रुष्य परस्थिती आहे या भागाचा दौरा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातुरमध्ये आले होते. मराठवाड्यात दुष्काळाची तिव्रता जास्त आहे त्यामुळे राज्यसरकारने तात्काळ दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली. निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली आहे. आजपर्यंत दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत यामुळे आगामी काळात भाजपाला मतरुपी भिक घालू नका असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 
 
विधानसभाच नाही तर लोकसभेवरही भगवा फडकवला जाणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाय, राज्यात दुष्काळजन्य स्थिती असतानाही राज्याचे मुख्यमंत्री हातात पंचांग घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त शोधत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.दरम्यान आज शहरात बुथप्रमुखांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. भाजपने युतीबाबत अल्टीमेट दिल्यांनतरही त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. आज लातूरमध्ये बुथप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

UPSC निकाल: UPSC परीक्षेत नागपूरचे तारे चमकले, प्रज्ज्वल आणि भाग्यश्रीने यश संपादन केले

भारतातील घरगुती एलपीजी सिलिंडर ६० रुपयांनी महागले, दिल्ली आणि मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये नवीन किंमती जाणून घ्या

बोर्ड परीक्षेतील अनियमितता महागात पडली; वाशिममध्ये ५१ शिक्षकांवर गुन्हे दाखल

पाकिस्तानमध्ये शिया समुदायाच्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार, ३८ जणांचा मृत्यू, हा रक्तपात का झाला?

पुढील लेख
Show comments