Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2018 (15:15 IST)
पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या  सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय आता 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. नाशिक जिल्हा विशेष न्यायालयात या केसचा  आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तर हा गुन्हा इतका गंभीर आहे की त्याला दुर्मिळ असा समजून आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली आहे.
 
नगर येथे 1 जानेवारी 2013 रोजी  सोनई या गावात  उच्च जातीच्या मुली सोबत प्रेमप्रकरणातून 3 जणांची निघृत  हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वीच्या सुनावणीत एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांच्यावरील दोष सिद्ध झाले होते. तर आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला. या सर्वांनी मिळून दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती.
 
सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात की, आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे अत्यंत क्रूर असून त्यांनी हे सर्व फार  थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत.  हे सर्व प्रकरण इतके भयानक आहे की आरोपींनी नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड केले आहे. त्यांनी  प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून केला आहे.  हे सर्व पाहून तर  रामायणतील राक्षसांची आठवण व्हावी. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं आहे.पद्धतीने तुकडे करून मर्डर केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे. तर त्या मुलीचा बाप ६० वर्षाचा होता तर त्याला हे कृत्य केल्यावर परिणाम काय होईल याची जाणीव होती त्याने हे सर्व घडवून आणले आहे. त्यामुळे या सर्वाना फाशीच झाली पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'वरात' म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवारांची टीका

LIVE: 'आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...', सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'बारात' म्हणणाऱ्या संजय राऊतांना शरद पवारांचा सल्ला

महिलांना आकर्षित करण्यासाठी Indian Air Force चा अधिकारी असल्याचा सांगायचा, पुण्यात तोतया जवानाला अटक

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

पुढील लेख
Show comments