Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘ती’ पाण्याची बाटली आणायला गेली मात्र…

Webdunia
सोमवार, 3 जानेवारी 2022 (15:17 IST)
‘ते’ दोघे पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करताना तहान लागली म्हणून थांबले व पत्नी पाण्याची बाटली आणण्याची गेली. मात्र दुर्दैवाने ती रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगात असलेल्या एका कंटनेरने तिला चिरडले.
 
ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे चौफुली येथे घडली. शकीलाबी नूर शहा (वय ५०, रा. तिडी,ता. वैजापुर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहा पतीपत्नी आपल्या दुचाकीवरून वैजापूरकडून कोपरगावच्या दिशने जात होते. प्रवास करीत असतांना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी ते थांबले.
 
पाण्याची बाटली आणण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या (एमएच ४६ एएफ ७९०३) क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला होता. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पसार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments