Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने बंडखोरांमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला

Webdunia
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (21:03 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून तूर्तास सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच सत्ता स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीय. तो नक्की कधी होईल, याबाबत अनिश्चितताच आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण जाली आहे. त्याची दखल बंडखोर गटाने नेतृत्व करणारे तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यासाठीच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यापासून अनेक वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि त्यांचे दिल्ली दौरेदेखील सतत सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विदर्भ मराठवाडा दौराही केला होता. यासोबतच उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभादेखील सातत्याने सुरू आहेत. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून, त्यांना थकवा जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
 
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार होता. पण मुख्यमंत्री शिंदेची प्रकृती बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हे ओळखत शिंदे गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ६ वाजता नंदनवन या निवासस्थानी बैठक होणार आहे. आमदारांनी काही काळ संयम ठेवावा असे आवाहन या बैठकीत केले जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर ६ तारखेला भगतसिंह कोश्यारी दिल्ली जाणार आहेत. त्यानंतर सोमवार किंवा मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे दिसून येत आहे. तर ८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय पेचावर सुनावणी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

पुढील लेख
Show comments