Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट!

Webdunia
मंगळवार, 2 मे 2023 (10:32 IST)
अवकाळी पावसाने मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पावसाचे चक्र मे महिन्यातही असेच सुरू राहिले तर, त्याचा आगामी मॉन्सूनवर विपरित परिणाम होऊ शकतो. परिणामी पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी कमी होऊ शकते किंवा मधल्या काळात मोठा खंड पडू शकतो, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही विचित्र स्थिती विदर्भातील बळीराजासाठी निश्चित धोक्याची घंटा आहे. 
  
गेल्या 35 वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करीत असलेले चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. चोपणे म्हणाले, मॉन्सूनचा पाऊस साधारणपणे उन्हावर अवलंबून असतो. विदर्भात जेवढे कडक ऊन व जीमन तापेल, तेवढा पावसाळ्यात अधिक पाऊस पडतो. दुर्दैवाने यंदा आतापर्यंत तरी तीव्र उन्हाळा जाणवला नाही. मध्यला काळातील दोन तीन दिवसांचा अपवाढ वगळता अख्ख्या एप्रिल महिन्यात पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्या अगोदर मार्चमध्येही कमी अधिक प्रमाणात असेच वातावरण होते. विदर्भात आणखी आठवडाभर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments