Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन पद्धतीने लसीकरण

Webdunia
सोमवार, 31 मे 2021 (07:47 IST)
परदेशात जाण्यापूर्वी लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे शहरातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्राधान्याने लस दिली जाणार आहे. महापालिकेच्या पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात सोमवारपासून (३१ मे ) वॉक इन पद्धतीने लसीकरणास सुरुवात होणार आहे. तरी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया शहरातील विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
 
परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, यासाठी त्यांना प्राधान्याने लसीकरण सुविधा देण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केल्याच्या तसेच महापौर म्हस्के यांनीही यासंदर्भात पत्र दिले होते, त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी परदेशी जाणाºया ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना वॉक इन पद्धतीने लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ही थेट लसीकरण सुविधा सकाळी ११ ते २ या वेळेत उपलब्ध केली आहे. ठाण्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य त्या पुराव्यानिशी म्हणजे परदेशात प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून लस देण्यात येणार आहे. सोमवारी प्रथम ५० विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते २ या वेळेत लस देण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार लसीकरणाचे वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे. तरी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments