Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली

Webdunia
शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (14:39 IST)
नांदेड सीमावर्ती भागात  सुविधा देण्याची ओरड करूनही महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृती समितीही स्थापन करण्यात आली असून, हा प्रश्न चिघळू शकतो.  
 
२०१८ पासून प्रश्न मांडत आहोत. चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, असे समितीचे गोविंद मुंडकर यांनी सांगितले.
 
कोणते तालुके, काय आहेत मागण्या?
 
१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुके तेलंगणाला जोडून आहेत. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या येथे आहेत. तेलंगणातील नागरिकांना सर्व सुविधा मिळतात. तेथील सरकार मजूर, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोफत वीज, पाणी, बियाणे, शेती औजारे मिळतात.  शिवाय मोफत शिक्षण मिळते. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र या सुविधांसाठी झगडावे लागते. नांदेड : सीमावर्ती भागात मागास जीवन जगत असलेल्या नागरिकांनी सुविधा देण्याची ओरड करूनही महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृती समितीही स्थापन करण्यात आली असून, हा प्रश्न चिघळू शकतो.  
 
२०१८ पासून प्रश्न मांडत आहोत. चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, असे समितीचे गोविंद मुंडकर यांनी सांगितले.
 
कोणते तालुके, काय आहेत मागण्या?
 
१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुके तेलंगणाला जोडून आहेत. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या येथे आहेत. तेलंगणातील नागरिकांना सर्व सुविधा मिळतात. तेथील सरकार मजूर, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोफत वीज, पाणी, बियाणे, शेती औजारे मिळतात.  शिवाय मोफत शिक्षण मिळते. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र या सुविधांसाठी झगडावे लागते.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

'मनमोहन सिंग यांना इशारा देण्यात आला होता, तरीही PMLA तुरुंगात पाठवण्यासाठी एक शस्त्र बनले', शरद पवारांचा मोठा खुलासा

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments