Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (15:25 IST)
बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर राज्यातील शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. यामुळे आता परीक्षा निकाल वेळेत लागणार आहे.
 
आजपासून  पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पेपर तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बहिष्कार टाकला होता. शासकीय आदेश दिल्यामुळे मागण्यांबाबत या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचं शिक्षक महासंघाने जाहीर केलं.
 
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 
तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका बारावीच्या विविध विषयांच्या तपासणीविना पडून होत्या.शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली नव्हती. नियमानुसार पाच जूनपूर्वी बारावीचा निकाल लावणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मोठा तिढा सुटला आहे. यामुळे आता सर्व सुरळीत होईल असे चिन्हे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments