Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन राहणार बंद

Webdunia
बुधवार, 13 मार्च 2024 (09:45 IST)
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन येत्या १५ मार्चपासून बंद राहणार आहे मात्र भाविकांना रोज सकाळी ५ ते ११ या कालावधीत मुखदर्शन घेता येणार आहे. या शिवाय मंदिराच्या बाहेर एलईडी स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. आषाढीपूर्वी गाभा-यातील सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे तसेच या काळात देवाच्या सर्व नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही मात्र पाद्यपूजा, तुळशीपूजा बंद राहणार, असे औसेकर महाराज यांनी सांगितले.
 
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीला करण्यात आले आणि मंदिरातील महालक्ष्मी मंदिर आणि बाजीराव पडसाळी येथील काम सुरू झाले. आता श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभा-याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये गाभा-यातील ग्रेनाईट फरशी, ऑईल पेंट, सिमेंट आदी काढून पुरातन रुप दिले जाणार आहे.
 
या कालावधीत वारकरी संप्रदायाची महत्त्वाची वारी म्हणजे चैत्रीवारी आहे. दि. १५ एप्रिल ते २१ एप्रिल या वारी कालावधीत मुखदर्शन दिवसभर सुरू राहणार, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली तर हे काम करीत असताना देवाच्या मूर्तीचे संरक्षण केले जाणार आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महायुती आघाडीतील सत्ताधारी पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढतील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

तुर्की-चीनला बसले भूकंपाचे धक्के

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

पुढील लेख
Show comments