Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी

Webdunia
गुरूवार, 16 मे 2019 (09:38 IST)
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर शहरासाठी आज अर्थात गुरुवारी सकाळी ६ वाजता पाणी सोडण्यास सुरुवात केली गेली आहे. चार गाळमोरीतून पाणी सोडण्यात आले असून त्यात आणखी वाढ करत तो ७ ते ८००० क्युसेक करण्यात आला आहे.
 
शहर पाणीपुरवठयाचा प्रमुख स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा सोमवारी कोरडा पडला. टाकळी इनटेक वेलमधील पाणी २२ मे पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. या दोन दिवसात उजनी धरणातून पाणी न सोडल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. औज बंधाऱ्यातील पाणी टाकळी इनटेक वेलमध्ये घेतले जाते.  टाकळी इनटेक वेलमध्ये सोमवारी ९ फूट ६ इंच पाणी होते. हे पाणी २२ मे पर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच टंचाई आढावा बैठक घेतली. आता हे पाणी औजमध्ये पोहोचण्यास आठ दिवसांचा कालावधी लागतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

पुढील लेख
Show comments