Festival Posters

पुण्यात तीन दिवस पाणी नाहीच फक्त एकच पंप सुरु

Webdunia
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (09:00 IST)
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतरही पालिकेच्या बंद केलेल्या दोन पैकी केवळ एकच पंप सुरु झाला आहे. पाणी उपसा करणारा एकुण तीन पैकी केवळ दोनपंप सुरु आहेत, अदयापही एक पंप बंद असल्यामुळे पाणी कपात सुरुच राहणारा असून, पाटबंधारे विभागाच्या एककल्ली  कारभार यामुळे  शहराच्या पुर्वभागाचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळी पाणीबाणी निर्माण झाली असून समस्त पुणेकर हैराण झाले आहेत. पाणीकपात करावीच लागेल अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.  पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांशी लवकरच बैठक झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणेकर नागरिकांनी  पाणी काटकसरीने वापरावे असा सल्ला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला तर, पुणे महापालिकेला जेवढा पाण्याचा कोटा दिला आहे, त्याहून अधिक पाणी महपालिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनाही पाणी द्यावे लागते. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे आता नागरिकांना पाणी सर्व कारणे पाहता योग्य पद्धतीने वापरावे लागणर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments