Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल, अशी आशा आम्हाला होती :शैलेश टिळक

Webdunia
शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (22:00 IST)
social media
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. त्यासाठी भाजपने पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश  टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील टिळकवाड्यात जाऊन शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उमेदवारी न मिळाल्यामुळं अन्याय झाल्याचं सांगतानाच शैलेश टिळक यांना अश्रू अनावर झाले आहेत.
 
मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा असल्यानं आम्ही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु आम्हाला तिकीट देण्यात आलेलं नाही. त्याचं कारण काय आहे, हे आम्हाला माहिती नाही. मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाल्याचं सांगताच शैलेश टिळकांचा कंठ दाटून आला.
 
गेल्या २० वर्षांपासून मुक्ता टिळक या मतदारसंघात काम करत होत्या. त्यांनी अनेक पदांवर काम केलं. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल, अशी आशा आम्हाला होती. परंतु ते होऊ शकलेलं नाही. परंतु आता पक्षानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही भाजपचं काम करणार असल्याचं शैलेश टिळक म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments