Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?

Webdunia
मंगळवार, 26 मे 2020 (16:41 IST)
कोरोना पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांना पत्र लिहून “विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? कोरोनासारख्या महामारीच्या काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी?” असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे.
 
“मे महिना संपत आला आहे, तरी या परीक्षांचा निर्णय होत नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबई आणि पुणे परिसरात अजून किती काळ टाळेबंदीत राहावे लागेल, याचे भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं, जर टाळेबंदी शिथिल झाली तर याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही, हे आपण देखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?”
 
दरम्यान मुंबई विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हे अनेक किलोमीटर प्रवास करुन त्यांच्या परीक्षाकेंद्राना पोहोचतात. आजच्या परिस्थितीत अशा हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचणेसुद्धा शक्य होणार नाही. कोरोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले आहे. किमान त्यात परिक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी त्यांच्या डोक्यावर नको, असेही राज ठाकरे यांनी सुचवले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती डिजिटल पेमेंटद्वारे खरेदी केली, व्हिडीओ व्हायरल

Tirupati Laddu Case:तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात भेसळ,सीएम चंद्राबाबू नायडूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले- 'कोणालाही सोडणार नाही

काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

पुढील लेख
Show comments