Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेव्हा लोकमान्य आगरकर यांना म्हणतात तुमचे ऐकायला हवे होते - राज यांचे मार्मिक चित्र

Webdunia
सोमवार, 21 जानेवारी 2019 (16:28 IST)
राज ठाकरे त्यांचे काका बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे व्यंगचित्रकार आहेत. काही दिवसांत राज यांनी भाजपा सरकार, प्रधानमंत्री आणि अमित शहा यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. अनेक चित्र अशी होती की ती अनेकदा जिव्हारी लागली होती. मात्र यावेळी राज यांनी मार्मिक चित्र काढत समाज व्यवस्था, जात धर्म आणि राजकारणी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या मार्फत त्यांनी समजावर जोरदार टीका केली आहे. लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचं म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य! असा मथितार्थ असलेले व्यंगचित्र राज ठाकरे यांनी चितारले आहे. टेंबू, कराड येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेचा उल्लेख करत राज यांनी सदर व्यंगचित्र काढले असून त्यांनी सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा उल्लेख या व्यंगचित्रात केला आहे. बँकांना लुटून फरार झालेले उद्योगपती, महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, धार्मिक तसेच जातीय संघर्ष, बेरोजगारी असे विविध भीषण प्रश्न पार्श्वभूमीवर दाखवत लोकमान्य टिळकांनी आज असते तर समाजसुधारक आगरकरांच्या भूमिकेचं एका शतकानंतर समर्थन केले असते असे राज ठामपणे म्हणत आहेत, हे चित्र सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाले असून अनेकांनी जातिवाद ही कीड आहे असे म्हटले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments