Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल कधी लागणार

Webdunia
शनिवार, 11 जुलै 2020 (09:16 IST)
दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना ही माहिती दिली आहे. 
 
कोरोना व्हायरसमुळे दहावीचा भुगोलाचा शेवटचा पेपर घेण्यात आला नाही. भुगोलाचा पेपर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या मार्कांची सरासरी काढून भुगोल विषयाचे मार्क देण्यात येतील. तसंच दिव्यांगांसाठी असणाऱ्या कार्यशिक्षण या विषयाचे मार्कही सरासरी पद्धतीनेच दिले जातील.
 
कोरोना व्हायरसच्या वाढता प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर बाकी होता. सुरुवातीला अनिश्चित काळासाठी हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता, पण कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, अखेर हा पेपर रद्द आला. कोरोना लॉकडाऊन सुरू होण्याआधी बारावीची परीक्षा संपली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments