Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्याचा त्रास का? - विशेष न्यायालय

Webdunia
शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (11:32 IST)
"पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले जाते, त्यावेळी न्यायालयाबाहेर त्यांचे समर्थक आणि हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी येत असतील, तसेच राऊत स्वत: प्रसारमाध्यमांसमोर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत वक्तव्य करत असतील तर या सगळयाची चिंता तुम्हाला का? तुमची नेमकी अडचण काय?" असा प्रश्न विशेष न्यायालयाने शुक्रवारी (21 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांना विचारला.
 
तसंच, या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास आणि आदेश देण्यास नकार दिला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
 
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केल्यानंतर राऊत यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या या अर्जावर सुनावणी सुरू असून सुनावणीच्या वेळी राऊत यांना न्यायालयात आणले जाते.
 
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावरही त्यांना न्यायालयात आणले जाते. न्यायालयीन कोठडीत असताना राऊत हे प्रसारमाध्यमांबरोबर बोलतात. याबाबत सरकारने पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काळा घोडा येथील सत्र न्यायालयातील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कुलाबा पोलिसांतर्फे शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. त्यावेळी तुम्हाला नेमकी अडचण काय? असा प्रश्न विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पोलिसांना केला.
 
Published By- Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार,आदित्य ठाकरेला आव्हान देणार!

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments