Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यंदा आषाढी पालखी सोहळा पायी होणार?

Webdunia
रविवार, 16 मे 2021 (10:13 IST)
आषाढी एकादशीसाठी पालखी सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे बसने नको तर पायीच व्हावा अशी आग्रही मागणी राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या संस्थानांनी केली आहे. यंदा वारीच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे नुकतीच एक बैठक पार पडली.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून वारीसाठी आषाढी एकादशीचा पालखी सोहळा पायीच व्हावा असा आग्रह संस्थांनी केला आहे. वारकऱ्यांची संख्या सरकार ठरवू शकतं पण पालखी सोहळा बसने नको अशीही भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
जुलै महिन्यात पालखी सोहळा आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालखी सोहळा बसमधून करण्यात आला होता.
 
संत तुकाराम महारज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं, की कोरोनाची कालमर्यादा कोणालाही माहीत नाही. कोरोना काळातच सध्या सर्व व्यवहार सुरू आहेत. यंदाचा पालखी सोहळा सरकारच्या नियमानुसार व्हावा. मात्र, तो पायी व्हावा अशी सर्वांची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
संत मुक्ताईंचा पालखी सोहळा 14 जूनला आहे. त्यापूर्वी शासनाने 1 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असं ठरल्याचंही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण होणार, लवकरच येणार!

पुढील लेख