Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (08:59 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सध्या सुरु असलेल्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश २७ जूनपासून सुरु करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता १४ ऑगस्ट पर्यंत विनाविलंब शुल्कासह असलेली मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत (कृषिविज्ञान विद्याशाखेचे शिक्षणक्रम आणि बी.एड. शिक्षणक्रम वगळून) सर्व शिक्षणक्रमांसाठी वाढविण्यात आली आहे.
 
याशिवाय विद्यार्थ्यांना रुपये शंभर विनाविलंब शुल्कासह दि. १ ते १५ सप्टेंबर पर्यंत तर रुपये पाचशे सह दि. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जात असून विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार नाही असे विद्यार्थी स्वतः सायबर कॅफेच्या माध्यामतूनही प्रवेश अर्ज भरू शकतात. मुक्त विद्यापीठाची राज्यात ८ विभागीय केंद्रे कार्यरत असून तेथेही प्रवेश घेण्यासाठी मदत मिळू शकते. शिक्षणक्रमांच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou. digitaluniversity.acअथवा ycmou .ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रकाश अतकरे यांनी केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून महिलेची हत्या

महाराष्ट्रात २५ मे पर्यंत वादळांसह मुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीने जारी केला इशारा

LIVE: कारगिलमधून बेपत्ता झाली नागपूरची महिला, सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा संशय

कारगिलमधून बेपत्ता झाली नागपूरची महिला, सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा संशय, मुलासोबत लडाखला गेली होती

वर्षाच्या अखेरीस होऊ शकतात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

पुढील लेख
Show comments