Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विकेंडच्या निमित्ताने लोणावळ्याला जात आहात , वाचा 'ही' बातमी

Webdunia
गुरूवार, 17 मार्च 2022 (22:01 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे होळी सेलिब्रेशनसाठी अनेक जण विकेंडच्या निमित्ताने लोणावळ्याला धाव घेत आहेत. परंतु लोणावळा शहरामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. अशा वेळी अवजड वाहने लोणावळा शहरातून जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाणही वाढत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
 
लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाणही वाढत आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलने, रस्ता रोको करून रस्ते विकास महामंडळ आणि आय.आय.बी. यांना निवेदने देऊन उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वरसोली आणि दृतगती महामार्गावरून लोणावळा एक्झीट मार्गासह मुंबईकडून खंडाळा मार्गाच्या दिशेने जात असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच अनेक अपघात देखील होतात. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही नवे आदेश जारी केले आहेत.
 
लोणावळा शहराच्या कार्यक्षेत्रातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. वाहतूक कोंडी कमी होऊन अपघात टाळण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments