Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्टोरी ठेवून तरुणाची आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 4 जानेवारी 2022 (16:02 IST)
औरंगाबाद (Aurangabad) येथील हर्सूल तलावात उडी घेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना फोन करून आपल्याला धोका मिळाला असल्याचं मित्रांना सांगितलं होतं. त्यानंतर संबंधित तरुणानं इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अग्निशमन दलाने गेली पाच दिवस हर्सूल तलावात शोधमोहीम राबवल्यानंतर, संबंधित मुलाचा मृतदेह आढळला आहे. 
 
तसेच ‘मी आता तलावात उडी घेत असून हा माझा शेवटचा कॉल असेल,’ असं सांगितलं. यानंतर मित्र परिवाराने तात्काळ हर्सूल तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी कुणालची दुचाकी आढळून आली. तर त्याची चप्पल पाण्यात तरंगताना आढळली. कुणालने उडी घेतल्याचं कळताच मित्रांनी हर्सूल तलावावरील सुरक्षारक्षक राजेश गवळे यांना घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांसह अग्निशामक दलाला पाचारण केलं. हर्सूल तलावात पाच दिवस शोधकार्य केल्यानंतर अखेर कुणालचा मृतदेह आढळून आला आहे.
 
आत्महत्या करण्यापूर्वी कुणालने ‘आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, पर उन हजारों मे हम नही’ अशी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली होती. कुणालने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हर्सूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments