Marathi Biodata Maker

ब्रेकअप नंतर नवीन नाते सुरू कसे करायचे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (21:30 IST)
8
फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामच्या या जमान्यात नाती तयार होण्यापेक्षा जास्त वेगाने तुटतात. नातेसंबंधांमध्ये मतभेद सामान्य आहेत आणि सामान्यतः हे टप्पे प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात येतात.
 
जर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर असाल तर तुमच्या जोडीदाराशी भांडण किंवा ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही. अशा वेळी चूक कोणाचीही असो, तुमचे मन वारंवार सांगत असते की नाते पूर्वीसारखे सुधारले पाहिजे.या साठी या काही टिप्स अवलंबवा.असं केल्याने तुम्ही जोडीदाराशी जवळीक साधू शकाल.
 
भांडण किंवा ब्रेकअपनंतर, जर तुम्हाला हे जाणवले की तुम्हाला तुमच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी पुन्हा जुळवून घ्यायचे आहे, तर या टिप्स तुम्हाला मदत करतील.
 
आजकाल, राग आल्यावर सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा फोन ब्लॉक करणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत, हे शक्य आहे की आपण आपल्या जोडीदाराशी थेट बोलू शकत नाही.अशा स्थितीत एका कॉमन फ्रेंडची मदत घ्या.किंवा तुमच्या समस्या समजून घेत असेल त्याच्याशी बोला.
अनेकदा काही असे मित्र असतात जे भांडण लावून द्यायचे काम करतात म्हणून सावधगिरी बाळगा.
 
एक सुंदर संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त करा.
कधी-कधी जे समोर सांगता येत नाही ते लिहिणे सोपे आणि सुंदर असते. म्हणून, तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी,
एक सुंदर संदेश लिहा. तुमची चूक मान्य करून तुम्ही हा संदेश पाठवून जोडीदाराचे महत्त्व कसे समजले हे तुम्ही सांगू शकता आणि तुमच्याकडून पुन्हा चुका होणार नाहीत हे देखील सांगू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जोडीदाराची स्तुती करू शकता आणि ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव करून देऊ शकता.
 
कोणतीही घाई करू नका
भांडण किंवा ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच घाईघाईने पॅच-अपचे प्रयत्न सुरू करू नका. लक्षात ठेवा की एकमेकांची अनुपस्थिती जाणवल्यानेच तुमचे प्रेम अधिक घट्ट होते. त्यामुळे तुमच्या पार्टनरला थोडा वेळ द्या जेणेकरून त्यालाही त्याची चूक किंवा तुमच्यापासून दूर राहण्याची जाणीव होईल.लगेच घाई केल्याने जोडीदाराचा राग शांत होत नाही. त्यामुळे ब्रेकअपनंतरच्या नात्याचा विचार करण्यासाठी एकमेकांना थोडा वेळ द्या.
सोशल मीडियावर तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा ब्रेकअपबद्दल लिहू नका.
अनेक वेळा असंही पाहायला मिळतं की भांडण किंवा ब्रेकअपनंतर लोक सोशल मीडियावर आपल्या पार्टनरबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी लिहितात किंवा मित्रांमध्ये पसरवतात. ही एक वाईट सवय आहे, जी तुमची पॅचअप होण्याची सर्व शक्यता नष्ट करते. जरी तुम्ही अंतिम ब्रेकअपच्या मूडमध्ये असाल आणि गोष्टी पुन्हा कधीच जुळवून घ्यायच्या नसल्या तरीही, तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या जोडीदाराबद्दल काहीही वाईट पोस्ट करू नये.
 
तुमचा जोडीदार जसा आहे तसा स्वीकारानातेसंबंधातील लोकांना त्यांच्या जोडीदाराने त्यांच्याप्रमाणे वागावे, त्यांच्या आवडीच्या लोकांना भेटावे, बोलावे किंवा त्यांच्यासारखे राहावे असे वाटते. पण हे शक्य नाही कारण तुमच्यावर कितीही प्रेम असलं तरी तुम्ही दोन भिन्न व्यक्ती आहात. त्यामुळे ब्रेकअपनंतर पॅचअप करण्याचा विचार तुमच्या मनात आला, तर आधी समजून घ्या की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा जसा आहे तसा स्वीकार करू शकाल का. याचा अर्थ त्यांच्या सवयींमुळे तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

लघु कथा : ज्ञानी ऋषी

घरी अचानक पाहुणे आले तर झटपट बनवा मिक्स पकोडे रेसिपी

Marathi Essay वृक्षारोपण आणि त्याचे महत्त्व

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

पुढील लेख
Show comments