Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज फडकावण्याबाबत हे फरक जाणून घ्या

Webdunia
आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो...
 
15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. दुसरीकडे, 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूला बांधलेला असतो. त्याला उघडून फडकावला जातो त्याला ध्वज फडकावणे असे म्हणतात. इंग्रजीमध्ये ध्वजारोहणासाठी Flag Hoisting आणि ध्वज फडकावण्यासाठी Flag Unfurling हा शब्द वापरला जातो.
 
पंतप्रधान आणि राष्ट्रपती
15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील असतात. यावेळी पंतप्रधानांनी ध्वजारोहण करतात. 26 जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
जागेचा फरक
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो. पंतप्रधान तेथे ध्वजारोहण करतात. यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथवर आयोजित केला जात असून या दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
राष्ट्रपती 26 जानेवारीलाच ध्वजारोहण का करतात?
पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. त्याआधी देशात ना संविधान होते ना राष्ट्रपती. या कारणास्तव, दरवर्षी 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाची शक्ती वाढणार, सहआयुक्ताची नियुक्ती होणार

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकची भीषण टक्कर

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

पुढील लेख
Show comments