Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराजांचे महान विचार

छत्रपती शिवाजी महाराजांचे महान विचार
, मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (17:57 IST)
shiv jayanti
सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
परस्त्रीबाबत आदर दाखवा.
एखादे झाड एवढे दयाळू आणि सहनशील असतं की दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे, खरी विरता विजयात आहे.
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारू शकतो.
शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरूही नका.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल