Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिल्वपत्राच्या मुळात लक्ष्मी देवीचा वास, 12 फायदे जाणून महत्व कळेल

Webdunia
महादेवाला बिल्वपत्र, धतूरा आणि आकडा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू धर्मात, बेलपत्र हे भगवान शिवाच्या उपासनेचा मुख्य भाग आहे. चला जाणून घेऊया हे शिव अर्पण करण्याचे 12 फायदे.
 
1. असे म्हटले जाते की महादेवाला बिल्व पाने अर्पण केल्याने लक्ष्मी प्राप्त होते कारण लक्ष्मीजी बिल्व पानांच्या मुळामध्ये राहतात. म्हणूनच या झाडाला श्री वृक्ष असेही म्हणतात. त्याची पूजा केल्याने धन प्राप्त होते.
 
2. या झाडाच्या मुळामध्ये तूप, अन्न, खीर किंवा मिठाई दान केल्याने गरिबी नष्ट होते आणि कधीही धनाचा अभाव राहत नाही.
 
3. या झाडाच्या मुळाची योग्य प्रकारे पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते.
 
4. संतान सुख प्राप्तीसाठी शिवलिंगावर फुलं, धतूरा, गंध आणि बिल्वपत्र अर्पित केल्यानंतर या वृक्षाच्या मुळाचे पूजन केले पाहिजे.
 
5. बिल्वपत्राच्या झाडाच्या मुळाचे पाणी कपाळावर लावल्याने सर्व तीर्थयात्रेचे गुण प्राप्त होतात.
 
6. बिल्वपत्राचे मूळ पाण्यात चोळले जाते आणि नंतर उकळले जाते आणि औषध म्हणून वापरले जाते. वेदनादायक आजारांमध्येही ते अमृतासारखे फायदेशीर आहे.
 
7. बिल्व पानांचे सेवन त्रिदोष अर्थात वात (हवा), पित्त (उष्णता), कफ (थंड) आणि पाचक प्रणालीतील दोष यापासून होणाऱ्या रोगांपासून वाचवतं.
 
8. बिल्व पानांचे सेवन केल्याने त्वचेचे आजार आणि मधुमेहाचे वाईट परिणाम वाढण्यापासूनही बचाव होतो आणि शरीरासह मन तंदुरुस्त राहतं.
 
 
 
9. हिंदू धर्मात, बिल्व झाडाची पाने शिवलिंगावर अर्पण केली जातात. भगवान शिव याने प्रसन्न होतात.
 
10. जे बेलपत्र अर्पण करून शिव-पार्वतीची पूजा करतात, त्यांना महादेव आणि देवी पार्वती या दोघांचे आशीर्वाद मिळतात.
 
 
11. असे मानले जाते की देवी महालक्ष्मी बेल झाडामध्ये निवास करतात. ज्या घरात बिल्व वृक्ष लावले जाते ते घर लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचे सांगितले जाते.
 
12. बिल्व पत्र हे शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक देखील मानले जाते. हे तीन डोळे भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान पाहतात. त्याचप्रमाणे श्रावणात आणि महाशिवरात्रीला महादेवाला बिल्व पाने अर्पण केल्याने समृद्धी, शांती आणि शीतलता प्राप्त होते.
 
टीप: कोणत्याही महिन्याच्या चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या आणि संक्रांतीच्या दिवशी बिल्व पाने फोडू नयेत.
 
बिल्वपत्र अर्पित करतानाचं मंत्र-
नमो बिल्ल्मिने च कवचिने च नमो वर्म्मिणे च वरूथिने च
नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुब्भ्याय चा हनन्न्याय च नमो घृश्णवे॥
दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनम्‌ पापनाशनम्‌। अघोर पाप संहारं बिल्व पत्रं शिवार्पणम्‌॥
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधम्‌। त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम्‌॥
अखण्डै बिल्वपत्रैश्च पूजये शिव शंकरम्‌। कोटिकन्या महादानं बिल्व पत्रं शिवार्पणम्‌॥
गृहाण बिल्व पत्राणि सपुश्पाणि महेश्वर। सुगन्धीनि भवानीश शिवत्वंकुसुम प्रिय।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments