suvichar

चातुर्मासात काय करावं आणि काय नाही, जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 2 जुलै 2020 (15:40 IST)
उपवास, भक्ती आणि शुभ कार्याच्या 4 महिन्याला हिंदू धर्मात 'चातुर्मास' म्हणतात. चातुर्मासाची कालावधी 4 महिन्याची आहे. हा काळ आषाढ शुक्ल एकादशी पासून सुरु होऊन कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत मानलं गेला आहे. चातुर्मासाच्या प्रारंभास देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं आणि शेवटी 'देवोत्थान एकादशी' असं म्हणतात.
 
4 महिने अश्या प्रकाराचे आहे - श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक.
 
का करतात उपवास : ध्यान आणि साधना करणाऱ्यांना हे महिने महत्वाचे असतात. वरील या 4 महिन्यांना उपवासाचे महिने यासाठी म्हणतात कारण की या 4 महिन्यात 
 
आपली पचन शक्ती कमकुवत होते तसचं अन्न आणि पाण्यामध्ये जीवाणूंची संख्या देखील वाढते. वरील 4 महिन्यापैकी पहिला महिना तर सर्वात महत्वाचा मानला गेला आहे.
 
विशेष नियम : या दरम्यान जमिनीवर झोपणं आणि सुर्योदयाच्या पूर्वी उठणं शुभ मानतात.
उठल्यावर अंघोळ करणं आणि जास्त काळ शांत राहणं. 
दिवसातून एकदाच जेवावं. एकाच वेळी चांगले अन्न खावे.
 
निषिद्ध कार्य : या 4 महिन्यात लग्न, जातकर्म संस्कार, गृह प्रवेश, हे शुभ कार्य निषिद्ध मानले गेले आहेत. पलंगावर झोपणं, शारीरिक संबंध ठेवणे, खोटं बोलणं हे सर्व निषिद्ध आहे. 
 
पदार्थांचा त्याग करणं : या उपवासात तेलकट वस्तूंचा सेवन करू नये. दूध, साखर, दही, तेल, वांग, पालेदार भाज्या खारट किंवा चमचमीत जेवण, मिठाई, सुपारी, मांस आणि मद्य याचे सेवन करू नये. 
श्रावणामध्ये पालेभाज्या जसे पालक, भाजी इत्यादी भाद्रपदात दही, अश्विन मध्ये दूध, कार्तिकमध्ये कांदा, लसूण आणि उडदाची डाळ या पदार्थांचा त्याग करतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर यांची आरती

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments