suvichar

बाथटबमध्ये बुडून झाला श्रीदेवींचा मृत्यू... रिपोर्ट आली समोर

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (17:14 IST)
दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं. भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. लग्न झाल्यानंतर श्रीदेवीचे नातेवाईक परत आले पण श्रीदेवींनी मात्र काही दिवस तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. दुबईमधल्या जुमैरा एमिराट्स टॉवर या हॉटेलमध्ये श्रीदेवी थांबल्या होत्या. हॉटेल रुमच्या बाथरूममध्ये श्रीदेवी बेशुद्ध आढळून आल्या. यानंतर त्यांना दुबईच्या राशित रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
बाथटबमध्ये बुडून मृत्यू
फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दिलेल्या वृत्तानुसार श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला आहे असा दावा खलीज टाईम्सनं केला आहे. श्रीदेवी यांच्या रक्तामध्ये दारूचा अंशही आढळून आला आहे. 
 
म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम
दुबई हे युएईमधलं प्रमुख शहर आहे. इथल्या कायद्यानुसार कोणत्याही परदेशी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम करून केलं जातं. पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होतं. त्यानंतर ही कागदपत्रं पोलिसांकडे दिली जातात आणि मग पोलीस मृत्यूच्या कारणावर शिक्कामोर्तब करतात. हा रिपोर्ट पोलीस मृत व्यक्ती ज्या देशाची आहे तिथल्या दुतावासाला देतात. यानंतर दूतावास मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करतं आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) देतं. यानंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपवलं जातं.

श्रीदेवी यांच्या पार्थिव शरीराला मुंबईमध्ये आणण्यात येईल आणि पवन हंस श्मशानमध्ये तिचा अंतिम संस्कार करण्यात येईल. मुंबईत सर्व कलाकार एकत्रित होत आहे. दक्षिण भारताहून देखील फिल्म इंडस्ट्रीचे मोठे मोठे कलाकार मुंबई पोहोचले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

पुढील लेख
Show comments