rashifal-2026

बैसाखी

Webdunia
बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते. बैसाखी शक्यतो चौदा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान येते. या महिन्यापासूनच ते पेरणीस सुरवात करतात. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी 'खालसा' पंथाची स्थापना केली होती.

यासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांपुढे जाऊन विचारले, की या तंबूत प्रवेश मिळवण्यासाठी कोण आपले प्राण देऊ शकेल? एक जण पुढे आला. त्याला घेऊन गुरू गोविंदसिंग तंबूत गेले.

थोड्या वेळात रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर आले. त्यांनी परत तोच प्रश्न विचारला व अशी कृती आणखी चार वेळा केली. काही वेळाने ते पाचही जण पगडी बांधून बाहेर आले.

त्या पाच लोकांना नंतर पाच पैर म्हटले जाऊ लागले. या दिवशी गुरूद्वारात जाऊन शीख बांधव प्रार्थना करतात. खालसा पंथाचा निर्माण दिवस म्हणूनही या दिवसाचे वेगळे महात्म्य आहे.

या दिवशी मिरवणूक काढली जाते. पंजाबमध्ये लोक पारंपारिक नृत्य, भांगडा करतात. संध्याकाळी शेकोटी पेटवितात व नवीन पेरण्या चांगल्या व्हाव्यात म्हणून प्रेरणा देतात. मुख्य समारंभ आनंदपुर साहिब येथे होतो.

सकाळी चार वाजता 'गुरू ग्रंथसाहिब'ला समारंभपूर्वक बाहेर आणले जाते. नंतर गादीवर बसविले जाते व मिरवणूक काढली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Chaitra Gauri Gifts ideas चैत्र गौरीच्या हळदी-कुंकवासाठी द्यावयाच्या काही खास 'वाण' कल्पना

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

Chaitra Gauri Naivedya चैत्र गौरीच्या नैवेद्यातील मुख्य पदार्थ पाककृती

Chaitra Gauri 2026 Wishes In Marathi चैत्र गौरी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Ramadan Eid Mubarak 2026 Wishes In Marathi रमजान ईद शुभेच्छा संदेश

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

पुढील लेख
Show comments