Dharma Sangrah

जपान ओपन स्पर्धेसाठी सात्विकसाईराज पात्र

Webdunia
बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:22 IST)
टोकियो:भारताचा युवा दुहेरी खेळाडू सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी याने मिश्र व पुरुष दुहेरीच्या पात्रता फेरीत एकाच सत्रात चार सामने खेळताना अफलातून क्षमतेचे दर्शन घडवीत या दोन्ही गटांत जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली.
 
आंध्र प्रदेशच्या केवळ 17 वर्षे वयाच्या सात्विकसाईराज रॅंकिरेड्डीने चिराग शेट्टीच्या साथीत खेळताना पहिल्या पात्रता फेरीत हिरोकात्सू हाशिमोटो व हिरोयुकी साएकी या जपानच्या जोडीचा 14-21, 22-20, 21-18 असा पराभव केला. तसेच सात्विक-चिराग जोडीने दुसऱ्या पात्रता फेरीत केईचिरो मात्सुई व योशिनुरी ताकेउची या जपानच्याच जोडीवर 21-18, 21-12 अशी मात करताना पुरुष दुहेरी गटात मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळविला. सात्विक-चिराग जोडीसमोर पहिल्या फेरीत मार्कस फेरनाल्डी व केविन संजया या तृतीय मानांकित कोरियन जोडीचे आव्हान आहे.
 
सात्विकने नंतर अश्‍विनी पोनप्पाच्या साथीत हिरोकी मिदोरिकावा व नात्सू साईतो या जपानी जोडीवर 21-13, 21-15 अशी मात केली. तर दुसऱ्या पात्रता फेरीत हिरोकी ओकामुरा व नारू शिनोया या जपानी जोडीचा 21-18, 21-9 असा पराभ” करताना सात्विक-अश्‍विनी जोडी मिश्र दुहेरीच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरली. त्यांच्यासमोर सलामीला टिन इस्रियानेट व पाचारपुन चोचुवोंग या इंडोनेशियन जोडीचे आव्हान आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

पश्चिम रेल्वे १५० विशेष गाड्या चालवणार, बहुतांश मुंबईहून सुटणार

LIVE: रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा सामना घरच्या मैदानावर केकेआरशी होईल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये १५ डबे असणार? शिंदे-ठाकरे गटाच्या खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आवाहन केले

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार

पुढील लेख
Show comments