Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs JAP Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

hockey
, शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (18:09 IST)
IND vs JAP Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. सुवर्णपदक लढतीत भारताने 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा 5-1 असा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तब्बल नऊ वर्षांनंतर या खेळांमध्ये हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
 
2023 आणि 2014 पूर्वी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1966 आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. चार सुवर्णांव्यतिरिक्त, टीम इंडियाने 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994, 2002 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर 1986, 2010 आणि 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
 
भारताने जपानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पहिला गोल केला. यानंतर तिसऱ्या क्वार्टर आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने प्रत्येकी दोन गोल केले. भारताकडून मनप्रीत सिंग (25वे मिनिट), अमित रोहिदास (36वे मिनिट), कर्णधार हरमनप्रीत सिंग (32वे मिनिट) आणि अभिषेक (48वे मिनिट) यांनी गोल केले. जपानसाठी तनाका सेरेनने एकमेव गोल केला.
 
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारताला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले, मात्र गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या क्वार्टरच्या 25व्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. माजी कर्णधार मनप्रीत सिंगने रिव्हर्स हिटवर गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाइमपर्यंत भारताने जपानवर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. 
 
32व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल केला. यासह भारताची आघाडी 2-0 अशी झाली. यानंतर 36व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली.
 
चौथ्या क्वार्टरच्या 48व्या मिनिटाला अभिषेकने मैदानी गोल करत टीम इंडियाची आघाडी 4-0 अशी वाढवली. यानंतर 51व्या मिनिटाला जपानच्या तनाका सेरेनने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह गोल केला. यानंतर 59व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने ड्रॅग फ्लिकवर आणखी एक शानदार गोल नोंदवत भारताचा विजय जवळपास निश्चित केला. यानंतर दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. अशा प्रकारे टीम इंडियाने हा सामना 5-1 असा जिंकून सुवर्णपदकावर कब्जा केला.
 
भारत आणि जपान आतापर्यंत एकूण 37 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 30 तर जपानने तीन जिंकले आहेत. चार सामने अनिर्णित राहिले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही तेरावी अंतिम फेरी होती आणि त्यात चार जिंकले आणि नऊ पराभूत झाले. 
 










Edited by - Priya Dixit  
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bihar : प्रेमी युगुलाला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण, तिघांना अटक