Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चला, आर्थिक कामे करून घ्या, अन्यथा फटका बसेल

Webdunia
रविवार, 7 जून 2020 (09:03 IST)
सरकारने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ३१ मार्चपर्यंत आर्थिक कामे पूर्ण करण्याची मुदत दिली होती. सरकारने त्या मुदतीत आता ३० जूनपर्यंत वाढ केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलेली काही कामे कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
पॅनकार्डला आधारकार्डसोबत लिंक करा 
पॅनला आधारशी जोडण्याची मुदत सरकारने ३० जूनपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आधार कार्ड पॅनशी जोडलेले नसेल तर लवकरात लवकर जोडून घ्या. नाहीतर तुमचे पॅनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. 
करात सूट मिळण्यासाठी गुंतवणूक
आर्थिक वर्ष २०१९-२० साठी प्राप्तिकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर कर वाचविण्यासाठी आयकर कायद्यातील कलम ८० सी, ८०डी, ८०ई अंतर्गत गुंतवणूक करण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. 
२०१८-१९ साठी आयटीआर
तुम्ही अद्यापही आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयटीआर रिटर्न भरला नसेल तर तुम्ही आता ३० जून पर्यंत २०१८-१९ साठी आयटीआर रिटर्न भरू शकता.  याशिवाय ३० जूनपर्यंत सुधारित आयटीआरदेखील दाखल करता येणार आहे. 
कर्मचाऱ्यांना मिळणारे फॉर्म-१६
सामान्यतः कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून फॉर्म-१६ देण्यात येतो. परंतु सरकारने यावेळेस एका अध्यादेशाद्वारे फॉर्म-१६ भरण्याची तारखेत वाढ करून ३० जून केली आहे. लहान बचत खात्याची ठेव
जर तुम्ही ३१ मार्च २०२० पर्यंत पीपीएफ किंवा सुकन्या समृध्दी खात्यात कोणतीही किमान रक्कम जमा केली नसेल, तर तुम्ही ती रक्कम ३० जून पर्यंत भरू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments