Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी सरकारची आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, काय आहे खास जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (10:07 IST)
मोदी सरकार ने कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळावे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली. 
 
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी आत्मनिर्भर पॅकेज 3.0 जाहीर करताना सांगितले की गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान रोजगार संवर्धन योजना सुरू करण्यात आली होती आणि आता ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा त्यांना मिळणार आहे ज्यांचे काम कोरोना कालावधीत गेले आहेत.
 
या योजनेचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) नोंदणीकृत लोकांना मिळणार. ही योजना 30 जून 2021 पर्यंत चालणार आहेत.
 
 ते म्हणाले, की या अंतर्गत अशा लोकांना फायदा होणार आहेत ज्यांचे पगार दरमहा 15,000 रुपयांपेक्षा देखील कमी आहेत आणि ती व्यक्ती ई पीएफओ मध्ये नोंदणीकृत आहे.
 
या अंतर्गत एक हजार पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि मालकांना दोघांच्या ईपीएफओ चा 24 टक्के हिस्सा सरकार देणार, जे दोन वर्षासाठी असेल. 
 
एक हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असलेल्या संस्थांमध्ये ईपीएफओ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वाटांपैकी 12 टक्के सरकार योगदान देणार.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त 50 कर्मचारी असलेल्या संस्थाना आपल्या संस्थेमध्ये कमीत कमी दोन नव्या कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार, तर ज्या संस्थांमध्ये 50 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, त्यांना किमान 5 कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

संभाजी भिडे गुरुजींवर हल्ला

World Art Day 2025 : जागतिक कला दिन

बंद कारमध्ये अडकून गुदमरल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू

चंद्रपूर : मोहुर्ली पर्वतरांगात आढळला वाघाचा अर्धा जळालेला मृतदेह

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments