Publish Date: Thu, 21 Nov 2019 (11:18 IST)
Updated Date: Thu, 21 Nov 2019 (11:21 IST)
5 ऑगस्ट नंतर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना खूप कमी झाल्या आहेत आणि यादरम्यान एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत स्पष्ट केलं.
काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत आहे. काश्मीरमध्ये लवकरात लवकर इंटरनेट सुविधा देणं, ही सरकारची प्राथमिकता आहे. औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. औषधांसाठी मोबाइल व्हॅनचाही वापर केला जात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संपूर्ण देशभरात NRC लागू केली जाईल, अशी अमित शाह यांनी संसदेत केली आहे.