Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात एकूण १० हजार २१६ नवे कोरोनाबाधित, रिकव्हरी रेट ९३.५२ टक्के

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (07:12 IST)
राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. त्या अनुषंगाने काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाबाधितांचा रोज वाढणारा आकडा राज्य सरकारसाठी आणि आरोग्य प्रशासनासाठी देखील चिंतेची बाब ठरला आहे. शुक्रवारी राज्यात एकूण १० हजार २१६ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ५५ हजार ९५१ झाली आहे. त्याचवेळी कोरोनामुळे ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५२ हजार ३९३ इतका झाला आहे. यामध्ये राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सातत्याने ९२ ते ९३ टक्क्यांचा आसपास राहिला आहे. ताज्या आकडेवारीच्या आधारावर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९३.५२ टक्के इतका नोंदला गेला आहे.
 
राज्यात एकूण ६ हजार ४६७ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये लक्षणं असलेले आणि लक्षणं नसलेले अशा दोन्ही प्रकारच्या करोनाबाधितांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघी ८८ हजार ८३८ इतकी राहिली आहे. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ४०१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये असून मुंबईत ९ हजार ५५ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये देखील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५५२ वर पोहोचली आहे.
 
दरम्यान, आतापर्यंत राज्यात १ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी २१ लाख ९८ हजार ३९९ व्यक्ती अर्थात चाचणी केल्यापैकी १३.१७ टक्के व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments