suvichar

कोरोनातून जगाला कायमस्वरूपी रिसेट बटण मिळेल : महिंद्रा

Webdunia
गुरूवार, 5 मार्च 2020 (14:38 IST)
चीनमधून पसरण्यास सुरू झालेल्या कोरोना व्हारसने जगभरात दहशत माजवली आहे. या परिस्थितीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, असे मत उद्योजक आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. सध्या आलेले संकट एक दिवस निघून जाईल, पण यामुळे आपल्याला एक कायमस्वरूपी रिसेट बटण मिळेल, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले.
 
सध्या अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना घरातूनच काम करण्याची मुभा देत आहेत. यावर आनंद महिंद्रा म्हणाले, ' या परिस्थितीत आपण काही गोष्टी नक्कीच  शिकू. पहिली म्हणजे वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढेल, डिजिटल कॉन्फरन्स वाढतील, मीटिंगच ऐवजी व्हिडिओ कॉल्स होतील आणि कमी हवाई वाहतूक होईल, ज्याने प्रदूषण टाळता येईल.' यासोबतच आपण आणखी काय-काय करू शकतो याबाबतही त्यांनी सोशल मीडियावर विचारणा केली.
 
गुगलने आयर्लंडची राजधानी डबलिनमधील मुख्यालयात हजारो कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे मुख्यालय रिकामे दिसून आले. एका कर्मचार्‍यामध्ये काही लक्षणे दिसून आली होती. हा कोरोना व्हायरसच असल्याचे स्पष्ट नव्हते. पण व्यवस्थापनाने तातडीने पुढील सूचना मिळेपर्यंत वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. ट्विटरनेही जगभरातील आपल्या 5 हजार कर्मचार्‍यांना शक्य तसे घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. चीनमधून सुरू झालेल्या या व्हारसने विश्व व्यापले आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची काळजी म्हणून घरातून काम करण्याची मुभा देत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपांवर आदेश बांदेकर यांचे सडेतोड प्रत्युत्तर

लोककला बळकट करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आशिष शेलार यांची घोषणा

LIVE: भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी… आदित्य ठाकरेंचा मोठा हल्ला

एफडीएकडून मुंबईतील शाळांमधील कॅन्टीन आणि माध्यान्ह भोजन केंद्रांची तपासणी तीव्र

नंदुरबार समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा ४० मुले आजारी

पुढील लेख
Show comments