Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान

Webdunia
सोमवार, 31 मे 2021 (07:36 IST)
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात २० हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी हा आकडा कमी झाला. रविवारी राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ८०१ वर पोहोचली आहे. तसेच ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
 
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. रविवारी  २२ हजार ५३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५ टक्के एवढे झाले आहे.
 
राज्यात ४०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात रविवारी ४०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४८,६१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,३१,८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,९८,९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रामदास आठवले म्हणाले भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

बुलढाणा जिल्ह्यातील धमक्यांना कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या... तीन वर्षांच्या प्रेमकथेचा दुःखद अंत!

पालघरमध्ये भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments